पोस्ट्स

कॉल सेंटर बँक मित्र

इमेज
                                  कॉल सेंटर बँक मित्र   बँक ही एक परवाना धारक वित्तीय संस्था आहे. बँक म्हटली की आर्थिक व्यवहार. बँकेचे मुख्य आर्थिक व्यवहार म्हणजे पैशांचे व्यवस्थापन, चलन विनिमय, पैश्याच्या ठेवी, कर्ज देणे होय. आज जग फार वेगाने पुढे जात आहे. आजच्या युगात बँकेचे व्यवहार खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कामाचे वाढते स्वरूप, ग्राहकांच्या वाढलेल्या अपेक्षा यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांना कामाचा व्याप वाढला आहे. त्यामुळे ग्राहकांशी निगडीत महत्त्वाची कामे करायला वेळ अपुरा पडतो. त्यामुळे बँक काही कामे आऊटसोर्स करतात, यात कॉल सेंटरला प्राधान्य दिले जाते. कॉल सेंटर सेवा विभागातील एक कार्यशाली संघ आहे जे येणारे कॉल्स रिसिव्ह करते आणि ग्राहकांना फोन कॉल करते. आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थितीत कॉल सेंटर खूप महत्त्वाची कामगिरी बजावत आहे. कॉल सेंटर टेली मार्केटिंगद्वारे बचत खाते, करंट खाते फिक्स्ड डिपॉझिट, रिकरिंग खाते, व्याज याबाबत ग्राहकांना योग्य आणि महत्त्वाची माहिती आपल्या स्टाफ मार्फत सांग...

ध्येय निश्चितीचे ५ महत्वाचे नियम

इमेज
             ध्येय निश्चितीचे ५ महत्वाचे नियम तुमच्या आयुष्यात एक निश्चित ध्येय असणे फार जरुरी आहे.    तुमच्या   आयुष्यात ध्येय   निश्चित नसल्यास काय होते , याकरिता मी माझे स्वतःचे उदाहरण तुम्हाला सांगत आहे . मी जेव्हा १० वी  पास  झालो तेव्हा मला कोणते क्षेत्र निवडायचे याची बिलकुल कल्पना नव्हती .  माझ्या   मित्रांनी सांगितले की वाणिज्य (Commerce) क्षेत्रात   तू admission घे कारण ते Science पेक्षा सोपे आहे .    म्हणून मी Commerce ला admission घेतले . मुंबईतल्या एका प्रसिद्ध कॉलेज मध्ये मी एक महिना कॉलेज attend केले आणि अचानक माझ्या मामांनी आणि घरच्यांनी commerce सोडून Diploma in Civil Engineering  ला admission घेण्यास सांगितले .  Diploma in Civil Engineering ला admission तर  घेतले   प ण मला तो अभ्यास काही झेपेना त्याचा परिणाम म्हणजे मी सर्व विषयात २ वर्ष नापास झालो . यामुळे माझ्या जीवनातील दोन मौल्यव...

विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ७ महत्वाच्या टिप्स

इमेज
                विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ७ महत्वाच्या टिप्स प्रत्येक विद्यार्थ्यांला उत्तम मार्कांनी पास व्हायची ईच्छा असते, त्याप्रमाणे ते खूप अभ्यासही करतात, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप मेहनत घेऊनही विषय आठवत नाही. (स्मरणात राहत नाही).  विषय आठवत नसल्याने, उत्तर लिहिता येत नाही. त्यामुळे कमी मार्क मिळतात किंवा नापास होण्याची नामुष्की येते. विषय स्मरणात न राहण्याची मुख्य कारणे: १. वर्गात शिकताना मनापासून लक्ष न देणे २. एकाग्रता नसणे ३. अभ्यासात रुची (Interest) नसणे ४. खुप विचार करणे प्रथमतः आपण स्मरणशक्ती म्हणजे काय हे जाणून घेऊया: आपण आपल्या रोजच्या जीवनात जे पाहतो, ऐकतो इतर विविध गोष्टी आपण करतो, त्या सर्व गोष्टी आपला मेंदू साठवुन ठेवत असतो.  मेंदूने साठवुन ठेवलेल्या सर्व गोष्टी आठवणे म्हणजे स्मरणशक्ती. विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप अभ्यास करून सुदधा विषय आठवत (स्मरणात) राहत नसेल, चिंता करायची गरज नाही. या लेखात दिलेल्या  ७   महत्त्वाच्या टिप्स तुम्ही अभ्यास करताना वापरल्यास तुमची स्मरणशक्ती नक्की ...

१० वी आणि १२ वीच्या परीक्षेत उत्तम मार्कांनी पास होण्यासाठी ७ उपयुक्त मुलमंत्र

इमेज
                                            १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत उत्तम मार्कांनी पास होण्यासाठी  ७ उपयुक्त  मुलमंत्र     १० वी आणि १२ वीच्या परीक्षेचे शिक्षणप्रणाली मध्ये विशिष्ट महत्व आहे. या परीक्षांना सामान्यतः बोर्डाची परीक्षा असे संबोधले जाते.  या परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनातील खूप महत्त्वाच्या  आणि त्यांच्या जीवनाला नवीन कलाटणी देणाऱ्या असतात. या परीक्षेत मिळणाऱ्या चांगल्या मार्कांवर पुढे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रवेश घेता येतो व आपले उज्ज्वल भविष्य घडवता येते.  त्यामुळे उत्तम  मार्कांनी   पास होणे हे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते. या परीक्षेत उत्तम  मार्कांनी    पास होण्यासाठी ७ उपयुक्त मुलमंत्र खास विद्यार्थ्यांसाठी. मुलमंत्र १. अभ्यासाची सुरवात लवकर करा ही  दोन्ही शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आधी असणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्टीतच तुम्ही अभ्...

विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी येणारा ताण कमी करण्यासाठी ६ उत्कृष्ट उपाय

इमेज
  विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी येणारा ताण कमी करण्यासाठी ६ उत्कृष्ट उपाय परीक्षा जवळ आली की विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण येतो . हा ताण का येतो ? ताणाची लक्षणे आणि परीक्षेचा ताण कसा कमी करावा याबाबत हा लेख खास विद्यार्थ्यांसाठी . विद्यार्थ्यांना परिक्षेच्यावेळी ताण का येतो ? १ . अभ्यासाची तयारी पुर्ण नसणे २ . पेपर कसा जाईल याची चिंता ३ . ऐनवेळी केलेला अभ्यास आठवणार की नाही ४ . अनपेक्षित प्रश्न येईल का याचा विचार मनात येणे तुम्हाला ताण आला हे कसे ओळखावे ? १ . पोटात गोळा येणे २ . रात्री झोप न येणे ३ . छातीत धडधडणे ४ . विचारांचा गोंधळ होणे ५ . डोकेदुखी विद्यार्थ्यांनो परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी या लेखातील नमूद केलेले   ६  उत्कृष्ट  उपाय वापरा आणि तणावरहित अभ्यास करून परीक्षेत यश मिळवा . परीक्षेचा ताण न येण्याकरिता किंवा ताण कमी करण्यासाठी शाळा आणि कॉलेज चालू झाल्यावर रोजच्या रोज अभ्यास करायला हवा .,  म्हणजे ऐनवेळी परीक्षेचा ताण येत नाही ....